स्वयंपाक
पितळेच्या भांड्यात स्वयंपाक कसा करावा? कढी किंवा टोमॅटो असलेल्या भाज्या केल्याने पितळी भांडी खराब होतात का?
2 उत्तरे
2
answers
पितळेच्या भांड्यात स्वयंपाक कसा करावा? कढी किंवा टोमॅटो असलेल्या भाज्या केल्याने पितळी भांडी खराब होतात का?
1
Answer link
पितळी भांडी म्हणजे स्वयंपाक घरचा दागिना आरोग्य आठवणी अभिमान आणि हो प्रॉपर्टी जिची किंमत दिवस गणिक वाढत जाते स्वस्त प्लास्टिक सारखी कमी होत नाही तेव्हा आजच स्मार्ट बना पण


पितळी भांडी वापरा पण पितळेच्या भांड्याना कल ई
लावुन घ्यावी आणि नंतर त्यात स्वयंपाक करावा
बिना कल ई न लावलेली पितळी भांडी वापरू नये तसेच कढी टाऌमेटो असलेल्या भाज्या आंबट पदार्थ बनवू नये कारण ते तसं केल्याने तब्येतीला घातक आहे म्हणून कल ई लावलेल्या भांड्यात स्वयंपाक करावा. पण कढी टाॅमेटोच्या भाज्या व आबंट असणाऱ्या भाज्या पितळेच्या भांड्यात आबंट पदार्थ कढी किंवा टाॅमेटो असलेल्या भाज्या लगेग तयार झाल्या कि दुसऱ्या भांड्यात काढून घ्यावे
पितळ:

बऱ्याच जणांच्या घरात आजीच्या काळातील काही पितळी भांडी असतीलच. ताट, वाट्या, तांब्या,परात,पितळी डबे असतील.
ह्या सगळ्या भांड्यांचा मुख्यतः कंटाळा येतो ते केवळ त्याला स्वच्छ करण्यासाठी लागणारा वेळ यामुळे. ही भांडी लिंबू वगैरे लावून स्वच्छ करता येतात अन्यथा काळी पडतात.
पितळेच्या भांड्यांचा सगळ्यात जास्त तोटा म्हणजे जर त्याला कल्हई केली नसेल तर त्यामध्ये अन्न शिजवणे किंवा पितळी ताटामध्ये जेवण करणे महागात पडू शकते. अगदी जेवण होईपर्यंत देखील ताटातील भाजीला हिरवा रंग येतो.
अशाप्रकारच्या ताटा मध्ये आम्लयुक्त पदार्थ खाणे देखील रोगाला आमंत्रण देण्यासारखेच आहे. ही भांडी शक्यतो धार्मिक कार्यासाठी वापरतात.
पितळी भांडी वापरताना घ्यायची काळजी:

पितळी भांडे वापरतानाही त्यांना आतून कल्हई केलेली असावी. या भांड्यामध्ये अन्न शिजवणे शक्यतो टाळावे. कारण मीठ आणि आंबट पदार्थ जसे, टोमॅटो आणि लिंबू यामुळे त्यात रासायनिक प्रक्रिया होते व त्यातून निघणारे द्रव्य मानवी शरीरास घातक असते.
म्हणूनच शिजवलेले अन्नदेखील पितळी भांड्यात साठवून ठेवू नये.
0
Answer link
पितळेच्या भांड्यात स्वयंपाक करणे हे अनेक दृष्टीने फायद्याचे असते. पण काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे:
- पितळेच्या भांड्यांचे फायदे:
- पितळेच्या भांड्यात उष्णता समान रीतीने पसरते, त्यामुळे अन्न चांगले शिजते.
- पितळात झिंक ( जस्त ) आणि तांबे असते, जे आरोग्यासाठी चांगले मानले जाते.
- पितळेच्या भांड्यात काय शिजवू नये:
- कढी किंवा टोमॅटो असलेल्या आंबट (acidity) भाज्या पितळेच्या भांड्यात शिजवू नये. आंबट पदार्थामुळे पितळात रासायनिक क्रिया होऊ शकते आणि ते अन्न आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
- लिंबू किंवा व्हिनेगर (vinegar) वापरलेले पदार्थ पितळेच्या भांड्यात बनवणे टाळावे.
- पितळेची भांडी वापरताना घ्यायची काळजी:
- पितळेच्या भांड्याला आतून कल्हई (tin coating) केलेली असावी. कल्हई केलेली भांडी वापरणे सुरक्षित असते.
- भांडी नियमितपणे स्वच्छ करावी, जेणेकरून त्यावर साचलेला कचरा निघून जाईल.
सारांश: पितळेच्या भांड्यात स्वयंपाक करणे फायदेशीर असले तरी, आंबट पदार्थ शिजवणे टाळावे.