2 उत्तरे
2
answers
केळवण म्हणजे काय? त्यात नेमकं काय करतात व का?
2
Answer link
माझ्या मावस बहिणीचे लग्न ठरले होते,तर सर्व नातेवाईक जमलो होतो केळवण करण्यासाठी, माझा लहान भाऊ सर्व पहात होता,सारखं केळवण,केळवण ऐकलं होतं,तर जेवण वगैरे झाल्यावर अगदी निरागस पणे त्याने विचारलं, केळवण सम्पलं का..? पण मला केळी कुठेच नाही दिसली..!!!
गमतीचा भाग झाला तो..
तर, लग्न,मुंज करायचे ठरल्यानंतर मुलगी/मुलगा ,मुंजा आणि त्यांचे आई-वडील,आजी-आजोबा वगैरे घरातील माणसांना जवळचे नातेवाईक, ओळखीचे लोक आपल्या घरी रीतसर आमंत्रण देऊन जेवायला बोलावतात त्याला केळवण म्हणतात.
कार्य ठरलेल्या घरात हजार कामे असतात,अशा वेळी स्वयंपाक वगैरे चा वेळ वाचतो.
तसेच पूर्वी लग्न झाले की मुलगी एकदा सासरी गेली की सम्पर्काची-दळणवळणाची साधने कमी असल्याने भेटीगाठी फार कमी होत, तसेच मुंज झाल्यावर मुलगा गुरुगृही जाई. तर ह्या केळवणाच्या निमित्ताने निवांत भेटणे,कोडकौतुक वगैरे करता येणे हा उद्देश असावा असे माझे मत आहे
केळवण हा काही धार्मिक विधी नाही,त्या मुळे बोलावलेल्या पाहुण्यांचे योग्य आदरातिथ्य करणे, ऐपतीप्रमाणे ओटी भरणे,भेटवस्तू देणे, इतकंच करतात
एकंदरीत 2 कुटुंबातील संबंध प्रेमाचे रहावेत ह्या उद्देशाने समाजप्रिय माणसाने सुरू केलेली प्रथा,इतकाच साधा उद्देश असावा
0
Answer link
केळवण म्हणजे काय?
केळवण हा एक मराठी शब्द आहे, जो 'भोजन' किंवा 'मेजवानी' या अर्थाने वापरला जातो. विशेषत: विवाहानंतर वधू आणि वर यांच्या घरी आयोजित केलेल्या पारंपरिक भोजनाला केळवण म्हणतात.
केळवणात नेमकं काय करतात?- भोजन: केळवण मध्ये पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थांचे भोजन असते.
- आदर: वधू आणि वर यांचा आदर केला जातो.
- भेटवस्तू: काही ठिकाणी वधूवरांना भेटवस्तू देण्याची प्रथा आहे.
- मनोरंजन: गाणी, संगीत, नृत्य यांसारख्या मनोरंजक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
केळवण करण्याचे मुख्य कारण म्हणजे नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देणे आणि त्यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात आनंदात करणे. हे एक प्रकारचे स्नेहभोजन असते, ज्यामुळे कुटुंबातील सदस्य आणि मित्र एकत्र येतात आणि नविन जोडप्यासोबत आनंद वाटून घेतात.
अधिक माहितीसाठी हे उपयुक्त दुवे: