2 उत्तरे
2
answers
माणुसकीचे नाते काळानुरूप कसे बदलले आहे?
7
Answer link
नाती
माणूस जेव्हा पत्रावळीवर जेवत होता तेंव्हा तो पाहुण्यांना पाहूनच फुलून जायचा..त्याच्या पाहुण्याच्या स्वागतासाठी कुटुंबासह यजमानांच्या अंगणातली वेलीही फुलून यायची....
काळ बदलला आणि माणूस मातीच्या भांड्यात जेवण करु लागला.. सोबतच नात्यांना मातीसारखेच जपू लागला ..
काळ बदलला आणि माणसानं पितळेची भांडी वापरायला सुरवात केली... तो दर सहा महिन्यांनी नात्यांना कल्हई करु लागला....
काळ बदलला आणि माणसाला काचेची भांडी आवडू लागली.. एखादा छोटासा धक्का किंवा ओरखडा सुध्दा नात्यांना सहन होईना..
काळ बदलला आणि जेवणाची ताटंही प्लॅस्टिक आणि थर्माकोलची झाली... सगळेच नातेसंबंध जणू त्याच्या सारखेच यूज आणि थ्रो होऊ लागले...!
आहे नं खरं..?
विचार करा... या पुढे काय होईल..............?
**************************************
संकलन
आर.एम.डोईफोडे
डाॅ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल, पुणे.
***************************************
माणूस जेव्हा पत्रावळीवर जेवत होता तेंव्हा तो पाहुण्यांना पाहूनच फुलून जायचा..त्याच्या पाहुण्याच्या स्वागतासाठी कुटुंबासह यजमानांच्या अंगणातली वेलीही फुलून यायची....
काळ बदलला आणि माणूस मातीच्या भांड्यात जेवण करु लागला.. सोबतच नात्यांना मातीसारखेच जपू लागला ..
काळ बदलला आणि माणसानं पितळेची भांडी वापरायला सुरवात केली... तो दर सहा महिन्यांनी नात्यांना कल्हई करु लागला....
काळ बदलला आणि माणसाला काचेची भांडी आवडू लागली.. एखादा छोटासा धक्का किंवा ओरखडा सुध्दा नात्यांना सहन होईना..
काळ बदलला आणि जेवणाची ताटंही प्लॅस्टिक आणि थर्माकोलची झाली... सगळेच नातेसंबंध जणू त्याच्या सारखेच यूज आणि थ्रो होऊ लागले...!
आहे नं खरं..?
विचार करा... या पुढे काय होईल..............?
**************************************
संकलन
आर.एम.डोईफोडे
डाॅ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल, पुणे.
***************************************
0
Answer link
माणुसकीचे नाते काळानुरूप अनेक बदलांमधून गेले आहे. पूर्वी, विशेषत: पारंपरिक समाजात, माणूसकीचे नाते हे समुदाय, कुटुंब आणि सामाजिक बांधिलकीवर आधारलेले होते. आता आधुनिक जगात, व्यक्तिवाद, तंत्रज्ञान आणि जागतिकीकरणामुळे या नात्यात बरेच बदल झाले आहेत.
1. सामुदायिक भावना विरुद्ध व्यक्तिवाद:
- पूर्वी: एकत्रित कुटुंब पद्धती, साध्या गरजा, आणि 'सर्वे भवन्तु सुखिन:' या भावनेतून लोकांमध्ये जास्त जिव्हाळा होता.
- आता: विभक्त कुटुंब पद्धती, भौतिक सुखाच्या मागे धावणे, आणि 'मी आणि माझे' या वृत्तीमुळे सामाजिक संबंध कमी झाले आहेत.
2. तंत्रज्ञानाचा प्रभाव:
- पूर्वी: संवाद थेट आणि समोरासमोर होत असल्यामुळे भावनांची देवाणघेवाण अधिक सहज होती.
- आता: सोशल मीडिया आणि ऑनलाइन संपर्कामुळे संवाद वाढला असला तरी, वैयक्तिक भेटी कमी झाल्या आहेत, ज्यामुळे नात्यांमधील भावनात्मकIntimacy कमी झाली आहे.
3. जागतिकीकरण आणि स्थलांतर:
- पूर्वी: लोकांचे जीवन एकाच ठिकाणी स्थिर असे, त्यामुळे शेजारी आणि समाजासोबत घनिष्ठ संबंध असत.
- आता: नोकरी आणि शिक्षणासाठी स्थलांतर वाढले आहे, ज्यामुळे माणसे आपल्या मूळ ठिकाणांपासून दूर जात आहेत आणि नवीन ठिकाणी संबंध जोडायला वेळ लागतो.
4. आर्थिक असमानता:
- पूर्वी: लोकांमध्ये आर्थिक समानता बऱ्यापैकी होती, त्यामुळे एकमेकांना मदत करण्याची भावना जास्त होती.
- आता: गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वाढल्यामुळे समाजातील काही लोक माणुसकीच्या नात्यांपासून दूर राहतात.
हे बदल सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारे झाले आहेत. तंत्रज्ञानाने जग जवळ आणले असले, तरी माणसांमधील थेट संवाद कमी झाला आहे. त्यामुळे, माणुसकीचे नाते अधिक दृढ करण्यासाठी सामाजिक बांधिलकी, समजूतदारपणा आणि empathy (सहानुभूती) वाढवणे गरजेचे आहे.
अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:
Related Questions
कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझी गळा याचा अर्थ कोणता येईल?
2 उत्तरे