
व्यावसाईक डावपेच
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
2
Answer link

अल्लमप्रभु : (१२ वे शतक). वीरशैव पंथाचे एक श्रेष्ठ संत व तत्त्ववेत्ते. त्यांना ‘प्रभुदेव’ असेही म्हणतात. ते⇨बसवांचे समकालीन असून त्यांच्यापेक्षा वयाने मोठे होते. त्यांचा जन्म शिमोगा जिल्ह्यातील (म्हैसूर राज्य) बळ्ळिगावी येथे झाल्याचे मानतात. तथापि त्यांच्या जीवनाबाबत अधिकृत माहिती मिळत नाही. ⇨चामरस (सु. १४३०) नावाच्या कवीने प्रभुलिंगलीले ह्या कन्नड काव्यग्रंथात (ब्रह्मदासकृत मराठी ओवीबद्ध अनुवाद लीलाविश्वंभर – १७२२) अल्लमप्रभूंचे चरित्र वर्णन केले आहे. चामरसापूर्वी हरिहरकृत प्रभुदेव रगळे हरीश्वरकृत प्रभुदेव पुराण इ. काव्यग्रंथांतही त्यांची चरित्रपर माहिती आहे. विरूपाक्षकृत चेन्नबसव पुराणातही (१५८५) त्यांची चरित्रपर माहिती मिळते. तथापि उपर्युक्त सर्व ग्रंथांतील माहिती सांप्रदायिक व पुराणपद्धतीची आहे. एवढे मात्र खरे, की वीरशैव पंथात अल्लमप्रभूंना फार महत्त्वाचे व आदराचे स्थान आहे. त्यांच्या वचनांवरून ते अत्यंत वैराग्यसंपन्न, ज्ञानी, विचारवंत, स्पष्टवक्ते व साक्षात्कारी पुरुष होते असे दिसते. त्यांनी वीरशैव पंथाचा प्रचार व प्रसार केला. सिद्धावस्था प्राप्त झाल्यावर अल्लमप्रभू कल्याण (हल्लीचे बसवकल्याण) येथे गेले. तेथे बसवांनी त्यांचा आध्यात्मिक अधिकार मान्य करून त्यांना शिवानुभवमंटपाच्या (वीरशैवांची धार्मिक संघटना) अध्यक्षपदी सन्मानाने बसविले. काही दिवसांनंतर आंध्र प्रदेशातील श्रीशैलम् येथे जाऊन अल्लमप्रभू समाधिस्थ झाले. बसवांच्या अगोदर त्यांनी समाधी घेतली.
शूम्यसंपादने ह्या प्रसिद्ध ग्रंथात अल्लमप्रभूंची वचने संकलित केलेली आहेत. त्यावरील अनेक टीकाग्रंथ उपलब्ध आहेत. याशिवाय त्यांच्या नावावरील अन्य ग्रंथांत षटस्थळज्ञानचारित्र्य, सृष्टीयवचन, मंत्रमाहात्म्य, बेडगिनवचन, कालज्ञानवचन आणि मंत्रगौप्य यांचा अंतर्भाव होतो. बेडगिनवचनमधील वचने प्रख्यात असून ती गूढार्थक आहेत. त्यांत त्यांचे आध्यात्मिक विचार आलेले आहेत. त्यांनी आपल्या वचनांतून तत्कालीन समाजातील अनिष्ट रूढी, अंधश्रद्धा, जातिभेद, अज्ञान, दंभ इत्यादींवर कठोर टीकाही केलेली आहे. तसेच त्यांनी केवळ पंथीय धर्मोपदेशावर भर न देता विशाल मानवी तत्त्वांचाही पुरस्कार केला आहे.‘गुहेश्वर’ अशी नाममुद्रिका ते आपल्या वचनांतून योजितात.
3
Answer link
अंतर्गत व्यापार हा देशांतर्गत व्यापार म्हणून ओळखला जातो तो म्हणजे एखाद्या देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमेच्या सीमेत वस्तू आणि सेवांची खरेदी आणि विक्री. म्हणून एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी आयात आणि निर्यात महत्त्वपूर्ण असते,तर त्याचे सकल उत्पन्न (जीडीपी) चे बहुतेक योगदान अंतर्गत व्यापारातून येते.
अंतर्गत व्यापार : पिकते तिथे विकत नाही हे सर्वश्रुत आहे. जिथे पिकते, तिथे कारखानेदेखील काढता येतील, असे सांगता येत नाही. त्यासाठी रस्ते, पाणी, वीज, जमीन, कुशल कामगार यांची उपलब्धी असेल, तसेच रेल्वेचे सान्निध्य जिथे असेल आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे जी राज्ये करातून सवलती देऊ करतात, तिथे कारखाने उभे राहतात. त्यांना लागणारा कच्चा माल मिळवावा व पुरवावा लागतो. वस्तू, सेवा व माल यांच्या विनिमयातून व्यापार वाढत राहतो.
अंतर्गत व्यापार जलमार्ग, हवाई मार्ग, अधिक करून खुष्कीच्या मार्गाने (लोहमार्ग व रस्ते) होत असतो. यांतील लोहमार्ग, जलमार्ग व विमानमार्ग यांनी होणार्याक वाहतुकीवरून काही प्रमाणात व्यापाराच्या आकार-व्यापाचा अंदाज करता येतो. १९९८-९९ साली भारतात रेल्वेने ४,४१६ लाख टन, जलमार्गाने १८० लाख टन आणि वायुमार्गाने ५४७ लाख टन इतकी वाहतूक झाली. यांत केवळ ६४ प्रकारच्या वेचक वस्तुमालांची गणना झाली आहे, सगळ्या नाही. ही किती रुपयांची उलाढाल होती, याची माहिती मिळत नाही. खुष्कीच्या मार्गाने म्हणजे मालवाहू मोटारीतून व बैलगाडीतून किती मालाची वाहतूक झाली, याचा अंदाज घेणे भूप्रदेशाचा पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण विस्तार पाहता केवळ अशक्य आहे. भारताचे स्थूल राष्ट्रीय उत्पादिताचे (जी. डी. पी.) आकडे मिळतात. त्यांत व्यापार या घटकामुळे किती भर पडली, हे दिलेले आहे. १९९०-९१ साली भारताचे स्थूल राष्ट्रीय उत्पादित ५,५२८ अब्ज रुपये होते. यात व्यापार ह्या घटकापासून (निव्वळ) उत्पन्न ६६६ अब्ज रुपये होते. १९९७-९८ साली या रकमा अनुक्रमे १२,७८६ व २,०५४ अब्ज रुपयांच्या होत्या. यावरूनही एकंदर व्यापारी उलाढालीची कल्पना येऊ शकते. या आठ वर्षांत व्यापार या घटकाचा स्थूल राष्ट्रीय उत्पादितातील भाग १२.२ टक्क्यांवरून १६.१ टक्क्यांइतका वाढला.
5
Answer link
नेटवर्क मार्केटिंग क्षेत्राचा हा एक तोटा आहे. जर तुम्ही नवीन ग्राहक जोडले नाही तर तुमच्या कारकीर्दीवर किंवा पगारावरही याचा परिणाम होतो. आणि शेवटी काही दिवसात तुम्हाला कळून चुकते की ह्या क्षेत्रात तग धरणे जवळपास अशक्य आहे.
त्यामुळे मी म्हणेल यातून बाहेर पडा व दुसरी नोकरी किंवा व्यवसाय शोधा.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही