संस्कृती धार्मिक स्थळ

कामाख्या देवीचे वैशिष्ट्य काय आहे?

2 उत्तरे
2 answers

कामाख्या देवीचे वैशिष्ट्य काय आहे?

0

कामाख्या देवी मंदिर हे भारतातील आसाम राज्यातील गुवाहाटी शहरामध्ये स्थित आहे. हे मंदिर तंत्रमार्गातील एक महत्त्वाचे शक्तिपीठ मानले जाते.

या मंदिराची काही वैशिष्ट्ये:
  • योनीरूपात देवी: येथे देवीची मूर्ती नसून योनीच्या रूपात तिची पूजा केली जाते.
  • अंबुबाची उत्सव: दरवर्षी जून महिन्यात अंबुबाची उत्सव असतो, ज्यात देवी रजस्वला होते, असा समज आहे. या काळात मंदिर तीन दिवस बंद ठेवले जाते.
  • नैसर्गिकरित्या रक्तस्त्राव: मंदिरातील योनीतून नैसर्गिकरित्या रक्तस्त्राव होतो, असे मानले जाते.
  • तंत्र साधना: हे मंदिर तंत्र साधनेसाठी महत्वाचे केंद्र आहे.
  • 51 शक्तिपीठांपैकी एक: कामाख्या मंदिर हे 51 शक्तिपीठांपैकी एक मानले जाते.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 5/4/2025
कर्म · 860
0
*🏪 या मंदिरात महिलांप्रमाणेच देवीचीही व्हर्जिनिटी टेस्ट, कपडा लाल रंगाचा झाल्यानंतर प्रसाद म्हणून दिला जातो!








————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
आसाममधील गुवाहाटी येथे स्थित कामाख्या शक्तीपीठावर लोकांची विशेष श्रद्धा आहे. https://bit.ly/4ckc9th ग्रंथानुसार देवी सतीसाठी असलेला महादेवाचा मोह भंग करण्यासाठी भगवान विष्णू यांनी आपल्या सुदर्शन चक्राने देवी सतीच्या मृत शरीराचे 51 भाग केले होते. ज्या-ज्या ठिकाणी देवी सतीच्या शरीराचे अवयव पडले, ते शक्तीपीठ रुपात प्रसिद्ध झाले. 
या शक्तीपीठाविषयी एक अत्यंत रोचक कथा प्रसिद्ध आहे. कथेनुसार या ठिकाणी देवीचा योनी भाग पडला होता. यामुळे देवी येथे प्रत्येक वर्षी तीन दिवसांसाठी रजस्वला होते. या काळात मंदिर बंद असते. तीन दिवसांनतर मंदिर पुन्हा उघडले जाते.
╔══╗ 
║██║ 
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ
येथे प्रसाद रुपात भक्तांना ओला कपडा दिला जातो. या वस्त्राला अम्बुवाची वस्त्र म्हणतात. देवी रजस्वला असताना मूर्तीच्या जवळपास पांढरा कपडा अंथरला जातो. तीन दिवसांनी मंदिर उघडल्यानंतर पांढरा कपडा देवीच्या रजने लाल रंगाने भिजलेला असतो. त्यानंतर हे वस्त्र प्रसाद स्वरुपात भक्तांना वाटले जाते.𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫 
या मंदिरात देवीची कोणतीही मूर्ती नाही. येथे देवीच्या योनी भागाचीच पूजा केली जाते. मंदिरातील एक कुंड नेहमी फुलांनी झाकून ठेवलेले असते. येथून जवळच एका ठिकाणी देवीची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. हे पीठ देवीच्या इतर सर्व पीठामध्ये महापीठ मानले जाते.
प्राचीन कथेनुसार, या ठिकाणी एक नरक नावाचा राक्षस होता. या राक्षसाने देवीसमोर लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. देवी नरकसोबत लग्न करण्यास तयार नव्हती, यामुळे त्यांनी त्या राक्षसासमोर एक अट ठेवली. अटीनुसार नरकाने एका रात्रीतून या ठिकाणी मार्ग, घाट, मंदिर हे सर्वकाही निर्माण केले तर देवी त्याच्यासोबत लग्न करेल. ही अट पूर्ण करण्यासाठी नरकाने विश्वकर्मा यांना बोलावून काम सुरु केले. काम पूर्ण होताना पाहून देवीने रात्र संपण्यापूर्वीच कोंबड्याद्वारे सकाळ झाल्याचे भासवले आणि यामुळे लग्न होऊ शकले नाही. आजही पर्वतावर जाण्याच्या मार्गाला नरकासुर मार्ग नावाने ओळखले जाते. ज्या मंदिरात देवीची मूर्ती स्थापित आहे, त्या मंदिराला कामादेव मंदिर म्हणतात.
या मंदिरासंदर्भात सांगितले जाते की, नरकासुरच्या अत्याचारांमुळे कामाख्या देवीच्या दर्शनात अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या होत्या. यामुळे क्रोधीत झालेल्या महर्षी वशिष्ठ यांनी या जागेला शाप दिला. असे सांगितले जाते की, शापाच्या प्रभावाने काळाच्या ओघात कामाख्या पीठ लुप्त झाले आहे.

ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498☜♡☞https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24




Related Questions

जटायु मंदिर कोठे आहे?