शेती

खरीप आणि रब्बी म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

खरीप आणि रब्बी म्हणजे काय?

23
खरीप आणि रब्बी हे शेतीप्रकारतील हंगाम आहेत...
त्या काळात यांची पिके घेतली जातात...

आता हंगाम म्हणजे काय ऐसा प्रश्न आपणास पडला असावा...?
- हंगाम म्हणजे शेतीमध्ये ठराविक काळात पिकांची पेरणी केली जाते आणि त्यास शेतीचा हंगाम असे म्हणतात... अर्थात तो ठराविक काळ हंगाम होय...


खरीप पिक
पावसाळ्यात जे पिक पेरले जातात ते म्हणजे खरीप पिक होय...
हे पिक जून-जुलै मध्ये पेरले जाते...(पेरणी हंगाम)
आणि नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये काढले जाते...(कापणी हंगाम)
तूर, ऊस, तांदूळ, बाजरा, ज्वारी, मका, तीळ असे खरीप पिक मध्ये समावेश आहेत...

रब्बी पिक
हिवाळ्यात जे पिक घेतले जाते ते म्हणजे रब्बी पिक होय...
हे पिक ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये पेरले जाते... (पेरणी हंगाम)
उन्हाळा लागण्याच्या वेळेस अर्थात मार्च-एप्रिलला हे पिक काढले जाते...(कापणी हंगाम)
आलू, जव, सरसो, चना, राई, गहु, मटर असे रब्बी पिक मध्ये समावेश आहेत...
उत्तर लिहिले · 7/8/2018
कर्म · 458560
0

खरीप आणि रब्बी हे भारतातील दोन प्रमुख कृषी हंगाम आहेत.

खरीप हंगाम:
  • खरीप हंगाम पावसाळ्याच्या सुरुवातीस सुरू होतो, म्हणजे जून-जुलै मध्ये.
  • या हंगामातील पिकांची काढणी सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये होते.
  • खरीप हंगामात भात, मका, बाजरी, ज्वारी, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, आणि कापूस यांसारख्या पिकांची लागवड केली जाते.
  • या पिकांना वाढीसाठी जास्त पाणी लागते.
रब्बी हंगाम:
  • रब्बी हंगाम हिवाळ्याच्या सुरुवातीस सुरू होतो, म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये.
  • या हंगामातील पिकांची काढणी मार्च-एप्रिल मध्ये होते.
  • रब्बी हंगामात गहू, हरभरा, जवस, मोहरी, आणि मसूर यांसारख्या पिकांची लागवड केली जाते.
  • या पिकांना वाढीसाठी कमी पाणी लागते.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 720

Related Questions

शेतीचा 2/3 हिस्सा म्हणजे किती?
भारतातील शेती उद्योग काय आहे?
शेतीच्या विकासातील मुख्य अडचणी काय आहेत?
सहकारी शेती पद्धती विषयी सविस्तर लिहा?
शेतकरी पुरावा नसताना शेती खरेदी करू शकतो का?
शेतीच्या विकासातील मुख्य अडचणी कोणत्या?
जर आपली शेती धोक्याने कुणी आपल्या नावावर केली, तर काय करावे?