भारतीय दंड संहिता भारतीय स्वातंत्र्य दिन

भारतीय घटनेतील मूलभूत तत्वे कोणती ?

6 उत्तरे
6 answers

भारतीय घटनेतील मूलभूत तत्वे कोणती ?

9
घटनाकारांनी नागरिकांच्या हक्कांच्या तरतूद करताना मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे असा फरक केला आहे. घटनेतील कलम ३६ ते ५१ मार्गदर्शक तत्वाशी संबंधित आहेत.
* मार्गदर्शक तत्वाचे वर्गीकरण तीन प्रकारात केले समाजवादी, गांधीवादी, उदारमतवादी या प्रकारात  केले आहे.
समाजवादी तत्वे -
* कलम ३८[१] - सामाजिक, आर्थिक, राजकीय, न्यायाने मुक्त समाज व्यवस्थेची निर्मिती करणे.
* कलम ३८[२] - उत्पन्न, दर्जा, सुविधा, संधी याबाबत विषमता कमी करणे.
* कलम ३९ - व्यक्तींना समान न्याय संधी,
* कलम ४१ - बेकारी, वृद्धत्व, आजारपण, अपंगत्व, सार्वजनिक सहाय.
* कलम ४२ - कामगारांना न्याय मानवी वातावरण,
* कलम ४३ - सर्व कामगारांना वाजवी वेतन.
* कलम ४३ अ - कामगारांना व्यवस्थापनात सहभाग,
* कलम ४४ ब - राज्यसंस्था सहकारी संस्थांची निर्मिती.
* कलम ४६ - समाजातील अनुसूची जाती, जमाती, व इतर दुर्बल घटक शैक्षिणक आर्थिक विकासाला हातभार
* कलम ४७ - लोकांचा आहार व जीवनमान उंचावणे
गांधीवादी तत्वे
* कलम ४० - स्वशासनाचे घटक म्हणून कार्य करता येईल अशारितीने संघटन अधिकार
* कलम ४३ - व्यक्तिगत अथवा सहकारी तत्वावर कुटीरउद्योगांना प्रोत्साहन देणे.
* कलम ४७ - आरोग्यास अपायकारक अशा मादकद्रव्ये प्रतिबंध.
* कलम ४८ - गाई, वासरे, जनावरांच्या कत्तलीस बंदी
उदारमतवादी तत्वे
* कलम ४४ - देशातील सर्व नागरिकांना सामान कायदा
* कलम ४५ - सहा वर्षापर्यंत मोफत शिक्षण
* कलम ४८ - आधुनिक व वैज्ञानिक आधारावर कृषी क्षेत्राचा विकास
* कलम ४८[अ] - वने व वन्यजीव संवर्धन
* कलम ४९ - राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाची स्मारके स्थळे यांचे जतन
* कलम ५० - राज्याच्या न्याययंत्रणा कार्यकारणीपासून विलग
* कलम ५१ - आंतरराष्ट्रीय शांतता अबाधित सुरक्षितता अबाधित राखणे
उत्तर लिहिले · 15/1/2018
कर्म · 2700
0
भारतीय घटनेतील मूलभूत तत्त्वे कोणती?
उत्तर लिहिले · 28/8/2023
कर्म · 5
0

भारतीय राज्यघटनेतील मूलभूत तत्त्वे खालीलप्रमाणे आहेत:

  1. सार्वभौमत्व: भारत स्वतःच्या अंतर्गत आणि बाह्य धोरणांचे निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहे. (भारतीय संविधान)
  2. समाजवाद: सामाजिक आणि आर्थिक समानता स्थापित करणे. (भारतीय संविधान)
  3. धर्मनिरपेक्षता: भारत कोणत्याही एका धर्माला राष्ट्रधर्म मानत नाही. सर्व धर्म समान मानले जातात. (भारतीय संविधान)
  4. लोकशाही: लोकांचे सरकार, लोकांद्वारे निवडलेले सरकार. (भारतीय संविधान)
  5. गणराज्य: भारताचा राष्ट्रप्रमुख निवडणुकीद्वारे निवडला जातो, तो वंशपरंपरागत नाही. (भारतीय संविधान)
  6. न्याय: सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय सुनिश्चित करणे. (भारतीय संविधान)
  7. स्वातंत्र्य: विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य. (भारतीय संविधान)
  8. समानता: दर्जा आणि संधीची समानता. (भारतीय संविधान)
  9. बंधुता: व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि अखंडता सुनिश्चित करणे. (भारतीय संविधान)
उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 420

Related Questions

क्रांतिकारक सेनापती बापट यांनी कोणती चळवळी व आंदोलने केली?
भारतात सर्वात सुंदर इमारत कोणती?
भारतीय करार कायद्यानुसार करारात भाग घेणाऱ्या व्यक्तींची काय पात्रता असणे आवश्यक आहे? घोड्यांची विल्हेवाट कोणत्या मार्गाने करता येते?
हबीब रेहमान यांचे भारतीय आधुनिक वास्तुकलेतील स्थान कसे स्पष्ट कराल?
भारतातील भूदल, वायुदल, नवदल प्रशिक्षण केंद्रांची नावे कोणती आहेत?
भारत व ब्राझीलचे स्थान, विस्तार व सीमा कोणत्या आहेत?
भारतात इंग्लिश का बोलली जाते?