निबंध

वटवृक्षाची आत्मकथा निबंध मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

वटवृक्षाची आत्मकथा निबंध मिळेल का?

4
मी वडाचे झाड बोलतोय. आज तुम्हाला मी माझ्याबद्दलची काही माहीती सांगणार आहे. मुलांनो मला पुर्वापासुन ‘वटवृक्ष’ किंवा ‘वडाचे झाड’ या नावाने संबोधले जाते. तुम्हाला माहीत असेलच मी भारतीय संस्कृतिचा एक भाग आहे. वटपोर्णीमेला तुमची आई/आज्जी तुमच्या आजोबांच्या, बाबांच्या निरोगी, दीर्घ आयुष्यासाठी फेऱ्या मारताना तुम्ही पाहीलेच असेल. माझ्या अंगाच्या चारही बाजुने, खोडातुन फुटलेल्या मुळ्या, ज्याला तुम्ही पारंब्या म्हणता, त्या जमीनीच्या आत पर्यंत पोहोचलेल्या असतात. माझे आयुष्य खुप दीर्घ आहे, अगदी तुमच्या आजोबांच्या जन्मापुर्वीही आमचा जन्म झालेला आहे. त्यामुळे तुमच्या वेळेपर्यंत आमची प्रचंड वाढ झालेली तुम्हाला दिसत आहे. आम्हाला “अक्षय वृक्ष’ असेही म्हणतात, कारण आमचा क्षय म्हणजे अंत होत नाही. याला ज्या पारंब्या फुटतात, त्या पारंब्या जमिनीत शिरकाव करून मुख्य झाडाला आधार देत आपला विस्तार करतात.

मुलांनो तुम्हाला माहीती आहे, आम्हाला वर्षभर फळे येत असतात, अनेक दुर्मिळ पक्षी ती फळे खाण्यासाठी येतात. महाराष्ट्राचे मानचिन्ह असणारा “हरियल’ हा पक्षी मेजवानीसाठी अतिशय दुरून या झाडाकडे आकर्षित होतो. माकडे, खारी, वटवाघळे, धनेश, पोपट, बुलबुल इत्यादी पक्षी वडफळांवर ताव मारण्यासाठी कितीतरी खेटा या झाडावर मारतात. निसर्गाच्या अन्नसाखळीमध्ये उंदीर हे घुबडांचे अन्न आहे. या घुबडांना वटवृक्षाच्या ढोल्या निवारा पुरवतात. आमची मुळे पाण्याच्या शोधात आडवी वाढून खूप लांबपर्यंत जातात. जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावर थांबविण्यासाठी या आमचा उपयोग होतो. आम्ही ५०० गॅलन वाफ बाहेर टाकत असतो त्यामुळे उन्हाळ्यातही आमच्याखाली जास्त गारवा असतो.

कित्तेक पिढ्या आमच्या अंगाखांद्यावर कधी वटपोर्णिमा, तर कधी सुरपारंब्या, कधी क्षणीक विसावा तर कधी गावच्या पंचायतीच्या निमीत्ताने बागडुन गेलेल्या आहेत. खुप आनंद वाटतो तुमचा सगळा परिवार वाढताना बघुन.

पण आता, खरं सांगु तर मी खुप दुःखी आहे. तुमच्या राज्यामध्ये रस्त्यांचे जे जाळे आहे ते विकासात्मक कामासाठी रुंद करणे अपरिहार्य आहे आणि ही कामे करताना आमचे असंख्य भाऊ-बंध तोडले गेले आहेत, तोडले जात आहेत. शहरी भागात वटपूजनासाठी झाडाजवळ जाण्याऐवजी आजच्या कार्यमग्न महिला बाजारातून एखादी वडाची फांदी विकत घेतात आणि त्याची पूजा करून दुसऱ्या दिवशी ती फांदी फेकून देतात, ही तर या झाडाची विटंबना आहे, पूजा नव्हे ! यामुळे असंख्य चांगल्या वडाच्या झाडांच्या फांद्यांची छाटणी वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी झालेली आपल्याला दिसते, यामुळे या अक्षय वृक्षाला आपण ग्रहण लावत आहोत.

आधीच संख्येने कमी असलेले वटवृक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. निसर्ग जे आपल्याला भरभरून देतो, त्याची परतफेड आपल्याला करायला नको का?

तुमचे दिवाणखाने सजवण्यासाठी लोकप्रिय ठरलेला “बोन्साय” चा व्यवसाय चांगलाच फोफावला आहे. विशाल, अजस्त्र अशी बिरुद मिरवलेला वड आज एका छोट्याश्या टेबलावर तुमच्या दिवाणखान्याची शोभा बनु पहात आहे, हे रुचते का तुम्हाला?

मुलांनो, हे कुठेतरी थांबवायला हवे. वडाची वृक्ष तोड थांबायला हवी. मग करणार ना तुम्ही मला मदत, आज तुमच्या पिढीने पुढाकार घेतला तरच.. तरच तुमच्या मुलाबाळांना हे वटवृक्ष पहायला मिळतील.
उत्तर लिहिले · 5/11/2019
कर्म · 34235
0
sicher, येथे वटवृक्षाची आत्मकथा निबंध आहे:

वटवृक्षाची आत्मकथा

मी एक वटवृक्ष आहे. माझा जन्म एका लहान बीजातून झाला. एका पक्ष्याने ते बीज माझ्या जमिनीत टाकले आणि त्यातून मी अंकुरलो.

मी हळू हळू वाढू लागलो. माझी मुळे जमिनीत खोलवर रुजली आणि माझे खोड मजबूत झाले. माझ्या फांद्या आकाशाकडे झेपावल्या आणि माझ्या पानांनी हिरवीगार चादर ओढली.

मी अनेक वर्षे या जगात उभा आहे. मी अनेक ऋतू पाहिले आहेत. मी ऊन, वारा आणि पाऊस सहन केला आहे. मी वादळे आणि त्सुनामी पाहिली आहेत.

मी अनेक लोकांना पाहिले आहे. लहान मुले माझ्या सावलीत खेळतात. तरुण जोडपी माझ्या खाली बसून प्रेम करतात. वृद्ध लोक माझ्या फांद्यांवर बसून विश्रांती घेतात.

मी एक साक्षीदार आहे. मी या जगाचा इतिहास पाहिला आहे. मी जन्म आणि मृत्यू पाहिला आहे. मी प्रेम आणि द्वेष पाहिला आहे. मी आनंद आणि दुःख पाहिला आहे.

मी एक भाग्यवान वृक्ष आहे. मला या जगात जगायला मिळाले. मला अनेक लोकांच्या जीवनाचा भाग व्हायला मिळाला.

मी आशा करतो की मी या जगात आणखी अनेक वर्षे जगेन आणि लोकांना आनंद देत राहीन.

माझ्या जीवनातील काही खास क्षण:

  • जेव्हा एका लहान मुलाने माझ्या फांदीवर पहिले पाऊल ठेवले.
  • जेव्हा एका तरुण जोडप्याने माझ्या खाली लग्न केले.
  • जेव्हा एका वृद्ध माणसाने माझ्या फांद्यांवर बसून आपले प्राण सोडले.

माझ्या भविष्यातील काही आशा:

  • मी आणखी मोठा व्हावा.
  • माझ्या फांद्या आणखी दूरवर पसराव्यात.
  • मी अनेक पिढ्यांसाठी सावली द्यावी.

धन्यवाद!

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 840

Related Questions

1920 ते 1974 या कालखंडातील निबंधाचे स्वरूप व वैशिष्ट्ये काय होती?
रंगमंचावरील एखाद्या नाटकाचा प्रयोग पाहून प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांची नोंद करा व त्या आधारे 'नाटकाला प्रेक्षकांचा प्रतिसाद' या शीर्षकाचा वीस ओळींचा निबंध तयार करा.
मी पाहिलेली सहकारी संस्था यावर निबंध लिहा.
सहकारी संस्थेच्या पत्त्यात बदल करून किती दिवसांच्या आत निबंध करावा?
माझ आई निबंध?
राजर्षी शाहू महाराजांचे कृषी क्षेत्रातील कार्य निबंध मराठी ५०० शब्द?
मोबाईल बंद झाले तर निबंध कसा लिहायचा?