शिक्षण विज्ञान

मूल्य शिक्षणात वैज्ञानिक दृष्टीकोन कोणी पेरला, व कशासाठी?

5 उत्तरे
5 answers

मूल्य शिक्षणात वैज्ञानिक दृष्टीकोन कोणी पेरला, व कशासाठी?

5

मूल्य शिक्षणात वैज्ञानिक दृष्टिकोन कोणी रुजवला आणि कशासाठी?

उत्तर लिहिले · 16/8/2022
कर्म · 100
0
आजच्या शिक्षणातून विद्यार्थ्याला ज्ञान का मिळत नाही याचे सुंदर विश्लेषण केले आहे.

भारताच्या संविधानाने वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणे हे भारतीय नागरिकांचे कर्तव्य म्हणून सांगितले आहे. तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन हे मूल्य शिक्षणातील एक महत्वाचे मूल्य आहे. हाच वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्यासाठी आयुष्यभर संघटीत काम उभे करून झटणारा कार्यकर्ता म्हणजे डॉ नरेंद्र दाभोलकर.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा जन्म १ नोव्हेंबर १९४५ रोजी सातारा येथे झाला. ते शालेय वयापासूनच उत्तम कबड्डीपटटू होते. सातारा येथील ‘शिवाजी उदय मंडळाच्या’ संघाची ओळख दाभोलकरांच्या खेळीमुळे विशेषतः त्यांच्या ‘हनुमान उडी’मुळे राज्यभर पसरली होती. त्यांनी बांग्लादेश दौऱ्यावर गेलेल्या भारताच्या राष्ट्रीय कबड्डी संघाचे नेतृत्व केले होते. दाभोलकरांच्या व्यक्तिमत्वाची ही बाजू खूप कमी जणांना माहिती आहे. त्यांनी १९७० साली मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम. बी. बी. एस. पदवी घेतल्यानंतर खूप कमी काळ वैद्यकीय व्यवसाय केला. बाबा आढाव यांच्यासोबत जातीमुक्त समाजाचे स्वप्न घेऊन केलेले ‘एक गाव एक पाणवठा’ हे त्यांच्या सामाजिक वाटचालीतील महत्वाचे आंदोलन होते. पुढे अर्थार्जन आणि कुटुंबाची जबाबदारी डॉक्टर असलेल्या पत्नी शैलाताईंवर सोपवून १९८२ साली ते पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून सामाजिक कार्यात उतरले. बी. प्रेमानंद यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन विषयक महाराष्ट्र दौऱ्याने प्रभावित होऊन. त्यांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ हा विषय कामाचे क्षेत्र म्हणून निवडला. या क्षेत्रातील त्यांच्या योदानामुळे रूढ अर्थाने शरीराचे डॉक्टर असणारे दाभोलकर पुढे मनावरील अंधश्रद्धांची जळमटे दूर करणारे मनाचे डॉक्टर ठरले.

श्रद्धेच्या प्रांतातील विसंगतीवर बोट ठेवण्यासाठी बुद्धीप्रामाण्यवादी चिकित्सक अनेक वैज्ञानिक पुरावे सादर करत असतात; प्रत्यक्ष प्रयोगांचे दाखले देत असतात; समीकरण मांडतात; सर्वेक्षणाच्या निष्कर्षांचे दाखले देतात; ग्राफ्स काढून मुद्दा पटवण्याचा प्रयत्न करतात. या त्यांच्या पुराव्यातून, दाखले - संदर्भातून भ्रामक विज्ञानाच्या आधारे चढवलेले श्रद्धेचे इमले कोसळू लागतील, असा एक (भाबडा) आशावाद चिकित्सक कार्यकर्त्यांच्या मनात दडलेला असतो. परंतु सश्रद्धांच्या समोर हे सर्व पालथ्या घागरीवर पाणी ओतल्यासारखे होत असते. या सर्व पुराव्याबरोबरच प्रत्येकाने विज्ञानाचे शिक्षण घेतल्यास वैज्ञानिक दृष्टिकोन प्राप्त होऊन श्रद्धेचे जळमट दूर होईल असे त्यांना मनापासून वाटत असते. त्यांचे हे प्रयत्न अत्यंत श्लाघनीय, प्रामाणिक व wishful thinkingचे असले तरी दैवी चमत्कार आणि अतींद्रिय शक्तीवरील विश्वास व भ्रामक विज्ञानावर आधारलेली मानसिकता वाढतच आहे, याबद्दल दुमत नसावे.

सर्व सामान्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी चिकित्सक नेहमीच विज्ञान व विज्ञान शिक्षणावर भर देत असतात. विज्ञान व तंत्रज्ञानातील लहान - मोठ्या तत्वांचा, नियमांचा, सिद्धांतांचा जसजसा परिचय होत जातो तसतसा रूढी, परंपरा यांच्यातील विसंगती, चमत्कार, अतींद्रिय वा अलौकिक शक्ती, दृष्टिभ्रम, हातचलाखी इत्यादींची पकड ढिली होत जाईल यावर त्यांचा दृढ विश्वास असतो. परंतु अलिकडील काही संशोधकांच्या मते विज्ञान शिक्षण हे कुठल्याही प्रकारे चिकित्सक दृष्टी देत नाही; उलट काही वेळा चिकित्सकतेला ते मारक ठरू शकते. याविषयी संशोधकांनी खालील तीन कारणांचा उल्लेख केला आहे:

1. विज्ञान शिक्षणाचा भर प्रामुख्याने विज्ञान - तंत्रज्ञान विषय समजून घेण्यासाठी लागणाऱ्या तांत्रिक कुशलतेवर असते. त्यात चिकित्सक वृत्तीत वाढ करणाऱ्या गोष्टींचा अंतर्भाव नसतो. शिकविणाऱ्यांना सर्व उत्तरं माहित असतात व विद्यार्थी प्रयोगातून (वा घोकंपट्टी करून) तीच अपेक्षित उत्तरं शिक्षकांच्या समोर सादर करतात. सामान्यपणे बरोबर उत्तर येईपर्यंत विद्यार्थी प्रयोगातील निष्कर्षाशी झटापट करत असतात.

2. विज्ञान शिक्षण सामान्यपणे संशोधनातील निष्कर्षांचा आढावा घेण्याच्या पावित्र्यात असते. संशोधनाचे उद्दिष्ट काय होते, त्याची पार्श्वभूमी काय होती याविषयी विद्यार्थी शेवटपर्यंत अनभिज्ञ राहतात. त्यामुळे काही चुकीच्या गृहितकांवर, गैरसमजुतीवर वा विषयाचे गांभीर्य लक्षात न घेता त्याचे सामान्यीकरण करण्यावर भर देण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो.

3. विज्ञानाच्या निष्कर्षांला नेहमीच 'अखेरचा शब्द' मानण्याची सवय जडलेली आहे. आज काढलेल्या निष्कर्षात पुढे केव्हा तरी बदल होऊ शकतात याची जाणीव ठेवली जात नाही. त्यामुळे संशोधकाने सादर केलेले data, ग्राफ्स, संदर्भ वा दुवे यांची फार चिकित्सा न करता स्वीकारल्या जातात. कारण त्यात वैज्ञानिक, प्रायोगिक, नैदानिक (clinical) अशा शब्दांची सर्रासपणे वापर केलेले असल्यामुळे समोरच्याला गप्प बसविणे सोपे जाते. पांढरा कोट घातलेल्यांच्या भोवती बुद्धीमत्तेचे वलय असते अशी एक (गैर) समजूत समाजात पेरली गेलेली आहे.

सामान्यपणे विज्ञानाचे विषय शिकविताना facts वर जास्त भर दिला जात असल्यामुळे शिकणाऱ्यांना जास्त चिकित्सकपणे विचार करण्यास वाव दिला जात नाही. एखाद्या पुराव्याची जास्त चिकित्सा न होता facts वा त्यावरून काढलेले निष्कर्ष स्वीकाराऱ्ह की अस्वीकृत एवढ्यापुरतेच विद्यार्थ्यांची बुद्धीमत्ता काम करते व शिक्षकांच्या शब्दांवर विश्वास ठेवण्याकडे कल वाढतो. त्यामुळे खरे विज्ञान व भ्रामक विज्ञान यांच्यातील ठळक फरक समजून न घेता विद्यार्थी पास होत होत शिक्षण संपवतो. कुठल्याही विज्ञानविषयक पाठ्यपुस्तकाची थोडीशी तपासणी केल्यास ही बाब चटकन लक्षात येईल. 500 - 600 पानांच्या पुस्तकात संशोधनासंबंधीच्या मुद्यावर 10-15 पानंसुद्धा त्यात नसतात. पुरावे कसे तपासावेत, गृहितकांची तपासणी कशी करावी, यापूर्वीच्या संशोधनातील उणीवा कोणत्या याविषयी कुणालाच देणे घेणे नसते. शिकविणाऱ्यांना अभ्यासक्रम संपविण्याची घाई व शिकणाऱ्यांना कसेबसे परीक्षेत उत्तीर्ण होऊन दाखविण्याची घाई. यामुळे वैज्ञानिक संकल्पनाबद्दल चिकित्सकपणे विचार करायला कुणालाही फुरसत नाही.

विज्ञान शिक्षण खरोखरच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवू शकते का याविषयी अमेरिकेतील विद्यापीठात एक प्राथमिक स्वरूपाची चाचणी घेण्यात आली. तीन विद्यापीठातील 16 ते 20 वयोगटातील 207 विद्यार्थ्यांनी या चाचणीत भाग घेतला. दोन सत्रात चाललेल्या या चाचणीतील पहिल्या सत्रात विज्ञानविषयातील काही जुजबी प्रश्नांना उत्तर देणे अपेक्षित होते. या सत्रातील प्रश्नांचे स्वरूप असे होते:

1. पृथ्वीवर असलेला अत्यंत महत्वाचा ऊर्जाश्रोत कोणता?
(a) वनस्पती (b) प्राणी (c) कोळसा (d) खनिज तेल (e) सूर्य
2. यापैकी कुठली गोष्ट बरोबर आहे?
(a) ऊर्जेला एका श्रोतातून दुसऱ्या श्रोतात परिवर्तित करता येते (b)ऊर्जाश्रोतात परिवर्तन करता येत नाही (c) चलनवलनासाठी लागणाऱ्या ऊर्जेला स्थितीज ऊर्जा (potential energy) असे म्हटले जाते. (d) ज्या वस्तूत ऊर्जा असते त्या ऊर्जेला गतीज ऊर्जा (kinetic energy) असे म्हटले जाते.(e) भविष्यकाळातील ऊर्जाश्रोत म्हणून आण्विक ऊर्जेलाच वैज्ञानिक मान्यता देत आहेत.
3. गर्भकाळात स्त्रीला कुठल्या गोष्टीमुळे इजा संभविण्याची शक्यता आहे?
(a) वडील RH- positive आणि आई RH - negative (b)गर्भावस्थेतील तिमाहीत गर्भवतीला जर्मन गोवर येणे (c) आई RH- positive आणि वडील RH - negative (d) (a) व (b) असल्यास (e) (b) व (c) असल्यास
4. ट्रिचिनॉसिस (trichinosis) या संसर्गजन्य रोगस्थितीचे वर्णन अशा प्रकारे करता येईल
(a) परावलंबी विषाणू (b) परस्पर स्पर्श (c) बाजारीकरण (d) उपयुक्त जीवाणू (e) सौम्य लक्षण
5. कार्बनी (organic) व अकार्बनी (inorganic) संयुक्तामधील ठळक व्यत्यास
(a) कार्बनी संयुक्त हे जैविक व अकार्बनी संयुक्त अजैविक (b)जगात सापडणाऱ्या कार्बनी संयुक्तांची संख्या अकार्बनी संयुक्ताच्या संख्येपेक्षा कित्येक पटीत आहे. (c) अकार्बनी संयुक्त सजीवापासून तयार होतात. (d) अकार्बनी संयुक्त निर्जीव वस्तूपासून तयार करता येतात (e) कार्बनी संयुक्तामध्ये कार्बनचा अंश असतो.
6. आवर्त सारणीमधील (periodic table) Pb ही संज्ञा या धातूला सूचित करते:
(a) लोखंड (b) फास्फोरस (c) शिसे (d) प्लुटोनियम (e) पोटॅशियम
7. नवीन खडूचे मोजमाप करण्यासाठी सर्वात इष्ट मापन कोणते असेल?
(a) मीटर (b) लिटर (c) ग्राम (d) सेंटीमीटर (e) किलोमीटर
8. यापैकी कुठल्या रोगात जनुकीय दोष आढळतात?
(a) डाउन्स सिंड्रोम (b)लैंगिक गुप्तरोग (c)मलेरिया (d) रक्ताचा कॅन्सर (e) श्वसनरोग
9. लिटमसी कागद हायड्रोक्लोरिक आम्लमध्ये बुडविल्यास
(a) काही बदल होत नाही. (b)कागद वितळून जाते. (c)कागद निळा होतो. (d) कागद तांबडा होतो. (e) कार्बन प्रक्रियेमुळे ऑक्सिजन बाहेर पडते.
10. पृथ्वी व सूर्य यामधील अंतर केव्हा कमीत कमी असते?
(a) उन्हाळ्यात (b) हिवाळ्यात (c) पावसाळ्यात (d) वसंत ऋतूत (e) वसंत ऋतू व उन्हाळा यांच्यामधील काळात

चाचणीच्या दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांना त्यांच्या अंधश्रद्धेविषयीच्या आकलनाविषयी श्रेणी देण्यास सांगितले गेले होते.
(श्रेणी :- 1 : यावर माझा पूर्ण अविश्वास आहे, 2 : याच्या खरेपणाविषयी शंका आहेत , 3 : काही सांगता येत नाही , 4 : हे खरे असावे असे वाटते, 5 : यावर माझा पूर्ण विश्वास आहे.)

1. एखाद्याच्या हस्ताक्षरावरून त्याचे व्यक्तिमत्व ओळखता येते.
2. मन:शक्ती वापरून भविष्यात वा दुसऱ्यांच्या मनात डोकावता येते.
3. एखाद्याच्या जन्मराशीवरून त्याचे व्यक्तिमत्व व त्याचे भविष्य कळू शकते.
4. अक्राळ विक्राळ अशा दोन पायाचा प्राणी हिमालयात फिरत असतो.
5. शारीरिक वेदना होत असलेल्या शरीराच्या भागावर लोहचुंबक ठेवल्यास वेदना थांबतात.
6. कानात पेटती मेणबत्ती ठेवल्यास शारीरिक व्याधी कमी होते.
7. निर्जन प्रदेशातील विहिरीत भूत प्रेतांचा वास असतो.
8. साखळी पत्रं पाठविल्यामुळे भाग्य उजळते.
9. परग्रहावर मानवी अस्तित्व आहे; परंतु शासन त्याविषयीच्या बातम्यांची जाहीर वाच्यता करत नाही.
10.शाप दिल्यास वाईट होण्याची दाट शक्यता आहे. एवढेच नव्हे तर शापाने माणसं मरतात.
11. हातात धरलेला आरसा खाली पडून त्याचे तुकडे झाल्यास तुमच्यावर नक्कीच संकट कोसळणार.
12. भानामतीसारखे प्रकार घडत असतात व भूत पिशाच्चामुळे माणसं मरूही शकतात.
13. काहींच्यात दैविशक्ती असल्यामुळे जमिनीतील पाण्यांचा ते शोध घेऊ शकतात.
14. कुत्री, मांजरं यासारख्या संवेदनशील पाळीव प्राण्यांना भूत प्रेतांच्या सानिध्याची चाहूल लागते.

या विधानांच्याबद्दल दिलेल्या श्रेणीत विविधता असली तरी बहुतेक श्रेण्या 2 व 4च्या मध्ये कुठेतरी होत्या. अंधश्रद्धा विषयीच्या श्रेणींची व पहिल्या सत्रातील विज्ञानविषयक प्रश्नांच्या उत्तरांची तुलना केल्यावर यात कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, हेच प्रकर्षाने जाणवले. विज्ञानासंबंधी अचूक ज्ञान असूनसुद्धा त्यातील बहुतेक अंधश्रद्धेपासून दूर राहू शकले नाहीत. पहिल्या सत्रातील चाचणीत जास्तीत जास्त गुण मिळविणारेसुद्धा दुसऱ्या सत्रात मांडलेल्या कित्येक चमत्कारांच्या दाव्यावर विश्वास ठेवत होते. यावरून विद्यार्थी वैज्ञानिक चिकित्सा पद्धतीचा वापर करत नव्हते हे स्पष्ट होते. विद्यार्थ्याना विज्ञानाचे शिक्षण देत असताना कशा प्रकारे विचार करावा यापेक्षा कुठला विचार करावा यावर भर दिल्यामुळे ही स्थिती ओढवली असावी, असे वाटते. ( Students are taught what to think but not how to think.). या चाचणीने काही प्रश्नही उपस्थित केले.

शिक्षणाची पातळी वाढत असताना भ्रामक विज्ञान, चमत्कार वा अतींद्रिय शक्तीवरील विश्वासात फरक पडत जातो का? विज्ञान शाखेतील अभ्यास , कला - वाणिज्य वा इतर मानव्य शाखेतील अभ्यासापेक्षा खरोखरच अंधश्रद्धेला तडा देवू शकते का? वैज्ञानिक खरोखरच चिकित्सक असल्यास विज्ञान शिक्षणाच्या वाटेवर असताना या प्रकारच्या अंधश्रद्धा गळून का पडत नाहीत? जास्त शिक्षित असल्यास अंधश्रद्धा कमी व कमी शिक्षित असल्यास अंधश्रद्धा जास्त असे विधान करता येईल का?

या सर्व गोष्टीं ची चिकित्सकपणे विचार करू लागल्यास आजच्या शिक्षण पद्धतीतच काही मूलभूत बदल अपेक्षित आहेत. केवळ विज्ञान शिक्षणावर भरवसा न ठेवता चिकित्सकपणा रुजविण्यासाठी वेगळ्याच प्रकारच्या शिक्षणाची आवश्यकता असून त्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.

जरी ही चाचणी सर्वसमावेशक नसली तरी या चाचणीतील निष्कर्ष विज्ञान शिक्षणाचा पुनर्विचार करण्यास भाग पाडते, हे मात्र नक्की.
उत्तर लिहिले · 7/8/2019
कर्म · 28530
0

मूल्य शिक्षणात वैज्ञानिक दृष्टिकोन डॉ. होमी भाभा आणि पं. जवाहरलाल नेहरू यांनी पेरला.

उद्देश:
  • आधुनिक भारताची निर्मिती: देशाला आधुनिक बनवण्यासाठी आणि अंधश्रद्धा, कर्मकांड यांपासून दूर ठेवण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक आहे, असे त्यांचे मत होते.
  • तार्किक विचारसरणी: लोकांमध्ये तार्किक विचारसरणी, चिकित्सात्मक दृष्टीकोन (Critical thinking) आणि प्रश्न विचारण्याची वृत्ती वाढावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
  • वैज्ञानिक शिक्षण: शिक्षणामध्ये বিজ্ঞানের समावेश करून विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व समजावे, यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले.

त्यांच्या प्रयत्नांमुळे शिक्षण क्षेत्रात বিজ্ঞানের महत्त्वाची भूमिका निर्माण झाली आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजण्यास मदत झाली.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 840

Related Questions

हायड्रंट म्हणजे काय?
कृत्रिम खाद्य रंग, त्यात जाणारे पदार्थ सांगा आणि त्याचे दुष्परिणाम लिहा. (सामान्य विज्ञान)
सरासरी सर्व नोबेल पदक विजेते मांसाहारी होते, मग शाकाहारी लोकांना नोबेल पदक मिळत नाही असे का?
परिवर्तन ही रिकामी जागा चालणारी प्रक्रिया आहे?
7 वी विज्ञानाचे प्रशन?
7 वी विज्ञानाचे प्रश्न?
जगात कोणता दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो?