Topic icon

वाढदिवस

0
तुम्हां आम्हां सर्वांना मनुष्य जन्म मिळाला हे पूर्व संचिताचे फळ आहे. ते सफल करण्यासाठी मला प्रभु परमात्म्याने भूतलावर पाठविले आहे. सर्व जन्माच्या पाठी मनुष्य जन्म पावे पोटी याउपरी किरीटी निर्मिली नाही.
म्हणजे विश्वासाने आपण म्हणू शकतो की, मी सर्व योनीतून फिरफिरुन या देही आलो . आता मात्र मला सर्वांचा स्वभाव माहित आहे.कसे चालावे वागावे बोलावे बसावे संवाद साधावा ही दृष्टी मनुष्याला लाभली . मनुष्य स्वभाव धर्म कसा आहे ? तो एकमेकांसाठी अनुरूप अशी कृती प्रिती शांती शिस्त आणि समाधान अंगी बाळगून विवेक वृत्तीने पुढे जात आहे की, षडविकारात अडकला आहे ... याची मीमांसा करत करत तो हा दिवस वर्तमान समोर आहे.
तो समन्वय ऋणानुबंध जोडत समतोल साधत एकमेकां साह्य करू असा विश्वास व्यक्त करतोय किंवा नाही.. मनुष्याची मनस्थिती कशी आहे व परिस्थिती काय बोलते आहे हे यांची देही याची डोळा मी पाहिला आहै हा जन्ममृत्युचा सोहळा ...
तर आपल्यापुढे विषय आहे... आपण कसे जगावे ? 
आपले मन मोकळे खुलं करून सहजतेने या वर्तमानी सर्वोत्तम प्रेम कामगिरी करत एकनिष्ठ राहण्याची किमया साधली पाहिजे.
आपण आपल्या सक्षमतेने या वर्तमानी एकमेकांना समजून उमजून सतत कार्यरत रहावे .कोणाही जीवाचा ना घडो मत्सर ...
शेवटी जे उपजे ते नाशे परी पुनरपि दिसे ... हे चक्र चालू राहते. हे खरं असेल तर आजचं वास्तव कसे आहे व ते प्रेमानं जगणं सुंदर करण्यासाठी मला याचि जन्मी साधी नारायण नाहीतर हीन पशुहून  ...
मला वाटतं सर्व काही सुरळीत चालू ठेवण्यासाठी आपले कौशल्य समाजसेवेतील चातुर्य संघटन वाढीसाठी जगाला प्रेम अर्पावे हा संदेश मिळाला आहे.. यासाठी अवघाचि संसार सुखाचा करीन...
मला भ्रमित करण्यात जे माझे विकार आहेत ते मलाच पूर्ण निर्मूलन करावयाचे आहेत.
मनुष्य हा समाज प्रिय आहे व तो समूहाने गुण्यागोविंदाने एकत्र राहतोय. हे सत्कृत्य आचरण नीतीत उतरणारा जीवभाव सर्वांठायीं असावा याकरिता तो समन्वय समन्यायी पद्धतीने पूर्ण समर्पित आहे.
तो समन्वय ऋणानुबंध जोडत प्रेम प्रेरणा नम्रता सहनशीलता करूणा दया क्षमा शांती शिस्त समाधान अंगी सद्गुणांची दिव्य रास निर्माण करीत जन हेचि जनार्दन एका जनार्दनी भजन करत उघडा डोळे बघा नीट.. हे सत्य अबाधित राखत आहे.
हे सत्कृत्य आचरणातून सिद्ध करण्यासाठी तो रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी असा समभाव एकरूपता ही साधत बहोत सुकृताची जोडी तेणें विठ्ठली आवडी.. म्हणत वारी वारी जन्ममरणांते वारी,हारी पडलो आता संकट निवारी ...याची जाणीव ही आहे .
या जाणीवेतून पुढे जात एकत्व सत्य प्रेम यांचे चिरंतन ध्यान करत आहे. ही एक नजर एक तत्व दृढ धरी मना हरिसी करुणा येईल तुझी... याची प्रचिती घेतोय. जीवनात सुंदर आविष्कार प्रकटन करतोय . आणि म्हणूनच तो सण उत्सव उपास तापास वर्तवैकल्य करीत पूजा अर्चना अत्यंत विनम्रपणे करीत आहे. हे जनमाणसं अंतर्बाह्य दुध जैसी सफेदी घेत आत बाहेर एकच ,जे आहे ते वास्तव प्रेमानं करीत दोषांचे निवारण करीत पुढे पुढे जात आहे . अखेर हे सर्व सर्वांचे भलं व्हावं यासाठी समर्पित आहे. हीच खरी ओळख खरी मैत्री खरी भक्ती खरी शक्ती आहे हे तो जाणतो व एकवटतो आणि समाजहित समाजकल्याण ही नम्रतेची पूजा पवित्र अंतःकरणाने करत आहे.
आपण आपल्या वाणीतून देहबोलीतून कर्मातून मानविय सद्गुणांनी युक्त अशी जीवनशैली तयार करत आहोत.
आपली सत्संग देशाटन कशी चालू आहे किंवा नाही याबाबत आपली ओळख समाजपटलावर आवश्य रहावी म्हणून सणवार लग्नकार्य उत्सव वाढदिवस जयंत्या पुण्यतिथी साजरी करतोय.तसेच समाजाभिमुख कामातून सेवाभावी ओळख म्हणून रौप्य अमृत हिरक महोत्सवात ही सहभागी होत राहतो .
हे सर्व आनंदी वृत्तीने व्हावे . सुख दुःखात ही जे करणे आवश्यक आहे तसे आचरण रहावे .
आणि म्हणूनच जनजागृतीसाठी परोपकारी विवेकी पालकत्व हवे. संवेदनशीलता ठेवून माणुसकी धर्म वाढवत जाणे उचित आहे.
संस्कृती सुसंगत ठेवून संयमी संवेदनशील समाजमन बांधिलकी जोडत आपण वागत रहावे . आपल्या परंपरा रितीरिवाज कायमदायम समर्थपणे चालवल्या तरच चांगल्याला चांगलं म्हणण्याची प्रथा सुरू राहील.  
माणसाला माणूस प्रिय असावा. यासाठी समर्पित भावनेने सेवा व्हावी आणि जगाला प्रेम अर्पावे. 
प्रेमभाव निर्मल निरंकुश निरागस निर्मोही निर्व्याज निर्लेप रहावा .. हेच जीवन सत्य आहे कारण देवानेच सर्वकाही आपणाला बहाल केले आहे.
आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे... मग काय खावे प्यावे..सगळं जाणतेणं करावं ... व्रतवैकल्ये उपवास कशाचा करायला हवा हे सत्कृत्य आचरण नीतीत उतरणारा रस्ता आहे तो चोखंदळ राखावा .. तुच तुझ्या जीवनाचा शिल्पकार...आणि हे देवकण सुशोभित करणारे कर्म बोलते करावं लागेल... कारण देवाचेच देणं जे शुभ आहे ते प्रेमानं जगणं सुंदर करीत आहे असा विश्वास दृढ धरावा व स्थिरमन शुभ शकुन आहे हेच आपले जीवनमान उंचावते, धन्यवाद जी.
 
उत्तर लिहिले · 16/7/2024
कर्म · 475
0
मला माफ करा, मला तुमच्या प्रश्नाची नक्की खात्री नाही. कृपया तुमचा प्रश्न अधिक स्पष्ट करा.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 220
7
वाढदिवस कसा साजरा करावा
आपल्याकडे वाढदिवस म्हणजे अभीष्टचिंतन करण्याचा म्हणजेच शुभचिंतन करण्याचा दिवस असतो त्यामुळे अर्थातच मेणबत्तीच्या ज्योती विझवून नव्हे तर निरांजनाच्या ज्योती उजळवून आणि औक्षण करून साजरा करण्यात यावा. ज्याचा वाढदिवस आहे त्याला आणि घरातील सर्व सभासदांना कोणते मिष्टान्न आवडते ते करावे आणि सर्वांनी एकत्र बसून आनंद घ्यावा.

वाढदिवस कसा साजरा करावा

वाढदिवस कसा करावा
थोरा-मोठ्यांच्या जयंतीप्रमाणे प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील लहान मुला-मुलींचे वाढदिवस साजरे करण्याची प्रथा तशी फार पुरातन आहे. हल्ली तर एक किंवा दोनच मुलांच्या कुटुंबात त्या मुलांवर दरवर्षी, त्यांच्या जन्मदिनी, वाढदिवसाचा संस्कार होण्याची फार आवश्यकता आहे. या मंगल दिवशी, दीर्घायुष्य लाभावे म्हणून श्री कुलदेवता स्मरण करून पुढील प्रमाणे संस्कार करावा. तरी शाकंभरी देवी नवरात्राच्या काळात सर्व सेवेकर्यानी जास्तीत जास्त आई भगवतीची सेवा करून आपले जीवन सुखकर व शांतिमय करावे.

हिंदू पंचांग प्रमाणे साजरा करावा. (इंग्रजी तारखेनुसार नको.) कारण आपली सर्व देव दैवते, साधू संत, ऋषि मुनी यांचे जन्मोत्सव तसेच आपल्या मृत आई-वडिलांचे श्राध्द पक्ष ही सर्व तिथी प्रमाणे करायची असतात, म्हणून वाढदिवसही तिथी प्रमाणे करावा.वाढदिवस आपल्या कुलदेवतेच्या साक्षीने व आशिर्वादाने साजरा करावा. ज्यांचा वाढदिवस असेल त्याला त्या दिवशी नवे वस्त्र घ्यावे (हे वस्त्र आपल्या पैशाने घ्यावे). त्या व्यक्तीला अभ्यंग व सचैल स्नान घालावे.
अभ्यंग: सुवासिक तेल लावून.
सचैल: ज्या वस्त्रांवर स्नान करायचे ती वस्त्रे नंतर दान ावी. (स्वतः वापरू नये.), त्याला नवे कपडे घालून रंगीत पाटावर बसवावे. औक्षण करून ओवाळावे नंतरदोन्ही हातात तांदूळ (अक्षता) घेऊन श्री रामरक्षेतील पहिले ९ श्लोक (या ९ श्लोकात डोक्यापासून पायापर्यंतच्या प्रत्येक अवयवांचा उल्लेख आहे.) म्हणून त्या-त्या अवयवांवर थोडे थोडे तांदूळ टाकत जावे. समोर श्री कुलदेवतेचा फोटो ठेवावा. फोटोला नैवे दाखवावा आणि विनंती करावी की, या मुलाला दीर्घायुष्य, चांगलं शिक्षण, चांगले आरोग्य देऊन याचा सांभाळ कर.ङ्घ उपस्थितांना गोडधोड खायला ावे. मात्र आहेर कुणाचाही घेऊ नये. या पध्दतीने वाढदिवस साजरा करावा.

टीप:

आजकालच्या वाढदिवशी मेणबत्त्या लावून त्या मुद्दाम विझवितात. हे अशुभ आहे.केक करतात व त्यावर सुरी फिरवतात. अन्न शस्त्राने कापणे हे सुध्दा अशुभ. म्हणून या दोन्ही गोष्टी टाळून वरील पध्दतीने वाढदिवस साजरा करावा.
उत्तर लिहिले · 29/7/2022
कर्म · 51830
0

तापमान वाढ (Global Warming) अनेक वायूंच्या उत्सर्जनामुळे होते, त्यापैकी काही मुख्य वायू खालीलप्रमाणे आहेत:

  • कार्बन डायऑक्साईड (Carbon Dioxide - CO2): हा सर्वात महत्त्वाचा ग्रीनहाउस वायू आहे. जीवाश्म इंधनांच्या (Fossil fuels) ज्वलनातून, जसे की कोळसा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, तसेच जंगलतोड आणि इतर औद्योगिक प्रक्रियांमधून कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन होते.

    स्रोत: US EPA - Greenhouse Gas Emissions

  • मिथेन (Methane - CH4): मिथेन हा एक शक्तिशाली ग्रीनहाउस वायू आहे. नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम उत्पादन, शेती (specialतः पशुधन), आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या स्रोतांद्वारे याचे उत्सर्जन होते.

    स्रोत: US EPA - Methane Emissions

  • नायट्रस ऑक्साइड (Nitrous Oxide - N2O): नायट्रस ऑक्साइड शेती, औद्योगिक प्रक्रिया, जीवाश्म इंधनांचे ज्वलन आणि कचरा व्यवस्थापन यांमधून उत्सर्जित होतो.

    स्रोत: US EPA - Nitrous Oxide Emissions

  • फ्लोरीनयुक्त वायू (Fluorinated Gases): हे मानव-निर्मित वायू आहेत, जे औद्योगिक प्रक्रिया आणि उत्पादनांमध्ये वापरले जातात. हे वायू वातावरणात दीर्घकाळ टिकून राहतात आणि त्यांचे तापमान वाढवणारे सामर्थ्य खूप जास्त असते.

    स्रोत: US EPA - Fluorinated Gases Emissions

या वायूंच्या वाढत्या प्रमाणामुळे पृथ्वीच्या वातावरणातील उष्णता वाढते, ज्यामुळे तापमान वाढ होते.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 220
0

भूपृष्ठापासून जसे जसे खोल जावे तसतसे दर 32 मीटर खोलीला 1 अंश सेंटिग्रेडने तापमानात वाढ होते.

geological सर्वे ऑफ इंडिया (भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण) यांच्या माहितीनुसार पृथ्वीच्या आत जास्तीत जास्त तापमान 1200°C पर्यंत असू शकते.

टीप:

  • तापमान वाढ सर्व ठिकाणी सारखी नसते.
  • geological सर्वे ऑफ इंडिया (भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण) ही भारत सरकारची एक संस्था आहे.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 220
0

तापमान वाढ एक जागतिक समस्या आहे, कारण त्याचे परिणाम केवळ एका विशिष्ट प्रदेशापुरते मर्यादित न राहता संपूर्ण जगावर होतात. खाली काही प्रमुख कारणे दिली आहेत:

  1. समुद्राची पातळी वाढणे:

    तापमान वाढीमुळे आर्कटिक व अंटार्क्टिक प्रदेशातील बर्फ वितळतो आहे, ज्यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे. यामुळे किनारी भागांमध्ये पूर येण्याची शक्यता वाढत आहे आणि पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते.

  2. नैसर्गिक आपत्ती:

    तापमान वाढीमुळे नैसर्गिक आपत्त्यांची संख्या वाढली आहे, जसे की अतिवृष्टी, दुष्काळ, वादळे आणि त्सुनामी. ह्यामुळे जीवित आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणात होते.

  3. कृषी उत्पादन घट:

    तापमान वाढीमुळे शेतीवर परिणाम होतो. अनेक ठिकाणी अनियमित पाऊस येतो, ज्यामुळे पिकांचे नुकसान होते आणि अन्नसुरक्षेची समस्या निर्माण होते.

  4. आरोग्यावर परिणाम:

    तापमान वाढीमुळे अनेक प्रकारचे रोग वाढतात. उष्णतेमुळे होणारे आजार, दूषित पाण्यामुळे होणारे रोग आणि हवेतील प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार वाढतात.

  5. पर्यावरणावर परिणाम:

    तापमान वाढीमुळे जंगलांवर आणि वन्यजीवांवर गंभीर परिणाम होतो. अनेक वनस्पती आणि प्राणी त्यांच्या नैसर्गिक अधिवासातून विस्थापित होत आहेत, काही प्रजाती तर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

या गंभीर परिणामांमुळे तापमान वाढ एक जागतिक समस्या बनली आहे, ज्यावर तातडीने उपाय करणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 220
0
शहरीकरणामुळे महाड शहरातील धोक्यात आलेले परिसंस्था आणि परिसरातील वाढ येथे दिली आहे:

वाढत्या शहरीकरणामुळे महाड शहरातील धोक्यात आलेले परिसंस्था:

  • वनक्षेत्राचे नुकसान:शहरीकरणामुळे इमारती, रस्ते आणि इतर बांधकामे वाढल्यामुळे वनक्षेत्र कमी झाले आहे.
  • पाण्याचे प्रदूषण:शहरी भागातील सांडपाणी आणि औद्योगिक कचरा नद्यांमध्ये सोडल्यामुळे जल प्रदूषण वाढले आहे.
  • हवा प्रदूषण:वाहनांची वाढती संख्या आणि औद्योगिक उत्सर्जन यामुळे हवेची गुणवत्ता खालावली आहे.
  • जैवविविधतेचे नुकसान:शहरीकरणामुळे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास नष्ट झाले आहेत, ज्यामुळे अनेक प्रजाती धोक्यात आल्या आहेत.
  • नैसर्गिक आपत्ती:पूर आणि भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढला आहे.

परिसरातील वाढ:

  • शहरीकरणामुळे महाड शहराच्या आसपासच्या परिसरात लोकसंख्या वाढली आहे.
  • औद्योगिकीकरणामुळे नवीन उद्योग सुरू झाले आहेत, ज्यामुळे रोजगार संधी वाढल्या आहेत.
  • शैक्षणिक संस्था आणि इतर सुविधांची उपलब्धता वाढली आहे.
  • दळणवळण आणि कनेक्टिव्हिटी सुधारली आहे.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 220