
मुस्लिम धर्म
0
Answer link
मोहम्मद शमीने रोजाबद्दल काय म्हटलं याबद्दल मला थेट माहिती उपलब्ध नाही. मात्र, मला काही संबंधित बातम्या मिळाल्या आहेत, त्या अशा:
* मोहम्मद शमीने रमजान महिन्यात रोजा न ठेवता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात एनर्जी ड्रिंक घेतले होते, ज्यामुळे उत्तर प्रदेशातील बरेलीच्या एका मौलानाने त्यांच्यावर टीका केली.
* शमीचे माजी कोच बदरुद्दीन सिद्दीकी यांनी त्यांचे समर्थन केले आणि म्हटले की, "आधी देश येतो. त्याच्यापूर्वी काहीच येत नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना पूर्ण झाल्यानंतरदेखील शमी रोजा करू शकतो".
* शमीच्या जवळचे कारी मुनीब म्हणाले, "आम्हा सर्वांना त्याचा अभिमान आहे. देशासाठी खेळण्याचे कामही त्याला अल्लाहने दिले आहे."
* मोहम्मद शमीचा भाऊ म्हणाला, "शमी एक खेळाडू आहे. त्याला जेव्हा सामना खेळायचा असतो तेव्हा तो रोजा ठेवत नाही. कारण गोलंदाजीत खूप मेहनत करावी लागते. यामुळे या परिस्थितीत तो रमजान महिन्यात उपवास करू शकत नाही. सामन्यानंतर तो रोजा ठेवेल."
या माहितीनुसार, मोहम्मद शमीने स्वतः रोजाबद्दल काही विधान केले आहे की नाही हे स्पष्ट होत नाही, परंतु त्याच्या कृती आणि त्याला मिळालेल्या समर्थनामुळे या विषयावर बरीच चर्चा झाली आहे.
%
0
Answer link
2021 पर्यंत हिंदू आणि मुस्लिम लोकसंख्येची आकडेवारी निश्चितपणे सांगणे कठीण आहे, कारण 2011 नंतर भारतात जात आणि धर्म आधारित जनगणना झालेली नाही.
2011 च्या जनगणनेनुसार भारतातील आकडेवारी:
- हिंदू: 96.63 कोटी ( एकूण लोकसंख्येच्या 79.8%)
- मुस्लिम: 17.22 कोटी ( एकूण लोकसंख्येच्या 14.2%)
2011 ते 2021 दरम्यान अंदाजित वाढ: दरम्यानच्या काळात लोकसंख्या वाढीचा दर पाहता काही प्रमाणात वाढ झाली असण्याची शक्यता आहे. 2021 मध्ये धार्मिक लोकसंख्येचा डेटा उपलब्ध झाल्यावर अचूक आकडेवारी मिळू शकेल.
तुम्ही खालील संकेतस्थळांना भेट देऊन अधिक माहिती मिळवू शकता:
1
Answer link
प्यू रिसर्च सेंटरच्या पाहणीनुसार, या कालावधीत भारतात सर्वच धर्मीयांची संख्या वाढली आहे. 2021 पर्यंत हिंदूंची संख्या 83.30 कोटींवरून 96.60 कोटींवर गेली. मुस्लीम धर्मीयांची संख्या 13.4 कोटींवरून 17.2 कोटींवर गेली. तर ख्रिस्त धर्मीयांची लोकसंख्या 2.30 लाखांवरून 2.80 कोटींवर गेली.
3
Answer link
मुघल वंशावळीतील क्रूर मुस्लिम शासक औरंगजेब याने संभाजी महाराजांना बंदी बनवून इस्लाम धर्म स्वीकारावा म्हणून अनंत मरणप्राय यातना दिल्या, त्यात संभाजी महाराजांनी स्वधर्म रक्षणासाठी मृत्यूला कवटाळणे पसंत केले पण इस्लाम स्वीकारला नाही.
6
Answer link
मक्का मशीद ही सौदी अरेबिया देशात आहे. ज्या शहरात ही मशीद आहे त्या शहराचे नावही मक्का आहे.
इस्लाम धर्मातील हे सर्वात पवित्र स्थळ आहे. मुहम्मद पैगंबर यांचे ते जन्मस्थळ आहे.
4
Answer link
यदा यदा ही धर्मस्य .. .', भगवद् गीतेतील काही श्लोक आणि गायत्री मत्रांचे दररोज पठण ... हे कोणत्या मंदिर वा मराठी शाळेतलं चित्र नाही , तर घुमान जवळ असलेल्या कादियॉं येथील जामिया अहमदिया या धार्मिक शिक्षण संस्थेतील आहे .. . तिथे शिकविली जाते सर्वधर्मांविषयी सहिष्णुता , देशभक्ती आणि सलोखा ... .
पंजाबच्या भूमीत घुमानपासून अठरा किलोमीटर अंतरावर इस्लामचं एक पवित्र रूप पाहायला मिळालं . संत नामदेव महाराजांनी धर्माची सीमा ओलांडली . त्यांचाच वारसा म्हणता येईल , अशा हजरत मिर्झा गुलाम अहमद या अवलियाने सव्वाशे वर्षांपूर्वी मुस्लिमांच्या अहमदिया पंथाची कादियॉं येथे स्थापना केली . त्याची पताका आता देशविदेशात फडकत आहे .

कादियॉंचं वैशिष्ट्य लोक अभिमानाने सांगतात की , जेव्हा भारत - पाकिस्तानची फाळणी झाली , त्या वेळी देशभर दंगली , कत्तली झाल्या ; पण कादियॉं हे असे एक गाव होते , तिथे मुस्लिमांचं रक्षण हिंदू आणि शिखांनी केले आणि मुस्लिमांनी या धर्मातील नागरिकांचं . इथे हाच सलोखा आजही कायम आहे . त्यामुळेच अहमदियाच्या मशिदीजवळच एक मंदिर आणि गुरुद्वारा आहे . या गावात कधीही जात- धर्मावरून वाद झालेले नाहीत .
आपल्या शब्दांतून वा कर्मातून कोणीही दुखवले जाऊ नये , देशाच्या प्रती प्रत्येकाने भक्तिभाव दाखवावा, जगाला प्रेम अर्पावे , असं मानणारा हा अहमदिया पंथ आहे . त्याची शिकवण देण्यासाठी कादियॉंमध्ये जामिया अहमदिया हे विद्यापीठाप्रमाणे शैक्षणिक संकुल उभारण्यात आले आहे . तिथे शिक्षण देण्याची भाषा अरबी आणि उर्दू असली तरी , केवळ इस्लामची शिकवण दिली जात नाही . हिंदू, शीख , बौद्ध आदी धर्मांचीही शिकवण दिली जाते. गीतेचे अध्याय आणि गायत्री मंत्र शिकविला जातो .
विद्यार्थ्यांसाठी सात वर्षांचा अभ्यासक्रम इथे चालविला जातो . आम्ही एका वर्गाला भेट दिली त्या वेळी मुलांनी यदा यदा ही धर्मस्य तसेच ॐ
भूर्भुव : स्व : . .. अर्थात गायत्री मंत्र आणि अन्य श्लोकांचे पठण केले.
" खिदमत ए खुल्क ' म्हणजे प्रत्येकाची सेवा हे ब्रीद असलेल्या अहमदिया पंथाचे मुख्य कार्यालय कादियॉंमध्ये आहे . त्याद्वारे शैक्षणिक संस्थाबरोबरच विविध सामाजिक उपक्रम चालविले जातात. नैसर्गिक आपत्तीच्या काळात ते आपला सेवाधर्म बजावतात . सेवा , शांतता आणि प्रेम यांचं अनोख रूप अहमदिया पंथाची शिकवणीतून दिसून येते .
बनारसमध्ये संस्कृत शिक्षण
जामिया अहमदियामध्ये कमरूल हक खान आणि महंमद नसीरूल हक हे दोन तरुण शिक्षक विद्यार्थांना संस्कृत विषय आणि गीता शिकवतात . या दोघांनीही बनारसमधील संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयात संस्कृतचे शिक्षण घेतले आहे . कमरूल हे शास्री म्हणजेच पदवी उत्तीर्ण आणि नसीरूल हक हे आचार्य म्हणजे पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आहेत.
संस्कृतमध्ये चर्चा
नसीरूल हे स्वतःचे नाव नसीर आचार्य सांगतात . त्यांनी संस्कृत भाषेतील शैक्षणिक कामगिरीबद्दल बनारसमधील संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयाने सुवर्णपदक देऊन गौरविले आहे . त्यांची भेट आज सकाळी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते , संस्कृतचे प्रकांड पंडित डॉ . सत्यव्रत शास्री यांच्याशी कादियॉंमधील " सराय वसीम ' या अभ्यागत निवासात झाली. दोघांमध्ये संस्कृत भाषा, दुर्मिळ ग्रंथ यावर अर्धा तास चर्चा झाली. विशेष म्हणजे ही चर्चा हिंदी , इंग्रजी नव्हे; तर संस्कृत भाषेत होती