पर्यटन स्थळे

भारतातील अजबगजब ठिकाणे कोणती?

2 उत्तरे
2 answers

भारतातील अजबगजब ठिकाणे कोणती?

0
भारतामध्ये अनेक अजबगजब ठिकाणे आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:

1. कुलधरा गाव, राजस्थान: हे गाव शापित मानले जाते. 1800 च्या दशकात हे गाव रहस्यमयरीत्या रातोरात खाली करण्यात आले.

2. रूपकुंड, उत्तराखंड: याला 'रहस्यमय तलाव' देखील म्हणतात. येथे शेकडो मानवी सांगाडे आढळले आहेत.

3. लेपाक्षी मंदिर, आंध्र प्रदेश: या मंदिरातील खांब जमिनीला स्पर्श न करता हवेत तरंगतात, ज्यामुळे ते एक रहस्यमय ठिकाण बनले आहे.

4. Magnetic Hill, लेह-लडाख: येथे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने गाड्या व इतर वस्तू ओढल्या जातात, असा अनुभव येतो.

5. जटिंगा, आसाम: येथे विशिष्ट वेळी पक्षी मोठ्या संख्येने आत्महत्या करतात, ज्याचे कारण अजूनही रहस्य आहे.

6. कोडिन्ही गाव, केरळ: या गावाला 'जुळ्या मुलांचे गाव' म्हणून ओळखले जाते, कारण येथे जगाच्या तुलनेत जास्त जुळी मुले जन्माला येतात.

7. लोंगेवा गाव, नागालँड: हे गाव भारत आणि म्यानमारच्या सीमेवर वसलेले आहे. येथील लोकांचे घर निम्मे भारतात आणि निम्मे म्यानमारमध्ये आहे.

उत्तर लिहिले · 17/4/2025
कर्म · 840
0
*🈺 भारतातील अजब गजब रहस्यमयी जागा*


 









————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
भारतात आहेत या १५ चित्रविचित्र रहस्यमयी जागा... 
🈺उंदरांचं मंदिर - करणी माता मंदिर, राजस्थान 
बिकानेरपासून ३० किलोमीटर अंतरावर असणारं हे मंदिर २०,००० उंदरांचं घर आहे. https://bit.ly/4lz3KXh इतकंच नाही तर इथे उंदरांची पूजाही केली जाते. हे उंदिर म्हणजे देवीचा अवतार असल्याचं इथे मानलं जातं. 
🉑पक्ष्यांची सामूहिक आत्महत्या - जतिंगा, आसाम
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात आसाममधील जतिंगा गावात स्थलांतर करणारे हजारो पक्षी अतिवेगाने उडत येतात आणि येथील झाडांना आणि घरांना मुद्दामून आपटतात आणि मरण पावतात. ते असं का करतात, हे एक मोठं कोडं आहे. 


🉑लोकतकचा तरंगता तलाव - मणिपूर
मणिपूरचा लोकतक तलाव हा जगातील एक नैसर्गिक आश्चर्य आहे. या तलावात अनेक अशी बेटं आहेत जी तरंगत राहतात. माणसं या बेटांवर शेती करतात. तसेच तेथे जगातील काही दुर्मिळ प्राणीही आढळतात. दरवर्षी हजारो पर्यटक या बेटांना भेट देतात. 
🉑रुपकुंड तलाव - उत्तराखंड 
उत्तराखंडात हिमालयाच्या कुशीत १६,५०० फुटांवर रुपकुंड तलाव आहे. इथे कोणत्याही प्रकारची मानवी वस्ती अस्तित्वात नाही. तरीही इथे नवव्या शतकातले ६०० मानवी सांगाडे सापडले आहेत. 𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫हे सांगाडे इथे कसे आले त्याची कोणालाही माहिती नाही.
🉑कुंभलगड किल्ल्याच्या भिंती - राजस्थान 
चीनच्या ग्रेट वॉलबद्दल तर आपल्याला माहिती असतं. पण, राजस्थानच्या कुंभलगड किल्ल्याला असलेली ३६ किलोमीटरची भिंत ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब भिंत आहे. या भिंतीत जवळपास ३०० मंदिरं आहेत. Ⓜ कोलकत्यातील वडाचे झाड : 
कोलकत्याच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये असलेले हे वडाचे झाड म्हणजे एक आश्चर्य आहे. हे वडाचे झाड म्हणजे एक जंगलच आहे. ते २०० वर्ष जुने आहे. ते इतके पसरले आहे की त्याचा परीघ जवळपास २ किलोमीटर इतका प्रचंड आहे. 
Ⓜ चुंबकीय टेकडी - लडाख 
लेह लडाख येथे असलेली चुंबकीय टेकडी हे एक मोठे आश्चर्य आहे. इथे एका विशिष्ट जागी न्यूट्रल गीअरमध्ये गाडी उभी केल्यास ती आपोआप या टेकडीकडे आकर्षित होते. 
Ⓜ कोडीन्ही गाव - केरळ : 
केरळमधील या २००० लोकवस्ती असलेल्या गावात तब्बल ३५० जुळ्यांचा जन्म झाला आहे. दर १००० लोकांमागे ४२ जुळ्यांचा जन्म या गावात नोंदवला गेला आहे.
Ⓜ पंबन बेटावरचे तरंगते दगड - रामेश्वरम
रामेश्वरमनजीकच्या पंबन बेटावरुन रामाने रामसेतू बांधला अशी आख्यायिका आहे. याच बेटावर असे काही दगड आढळतात जे पाण्यावर तरंगतात. रामाने सेतू बांधण्यासाठी हेच दगड वापरले असावेत अशी समजूत आहे.
🉑झाडांच्या मुळांचे पूल - चेरापूंजी, मेघालय 
मेघालयमधील लोकांनी इथल्या जंगलातील झाडांच्या विस्तृत मुळांना असा काही आकार दिला की त्या मुळांचे साकव तयार झाले. गावातील लोक हे साकव दळणवळणासाठी वापरतात. 
🉑 लटकते खांब - लेपक्षी, आंध्र प्रदेश : 
आंध्र प्रदेशातील लेपक्षी मंदिरातील ७० खांबांपैकी एक खांब असा आहे जो कोणत्याही आधाराशिवाय लटकतो. या खांबाच्या खालून एखादा कपडा किंवा ओढणीही आरपार जाऊ शकतो. 
🉑 महाबलीपुरममधील झुलता दगड - : तामिळनाडू 
भौतिकशास्त्राच्या सर्व नियमांना तिलांजली देणारा एक मोठा खडक महाबलिपूरम येथे आहे. त्याला प्रेमाने कृष्णाचा लोण्याचा गोळा असंही म्हटलं जातं. कोणत्याही आधाराशिवाय हा पाच मीटर व्यासाचा खडक एका उतरत्या पृष्ठभागावर गेली अनेक शतकं उभा आहे. 
🉑 बडा इमामबरा - लखनऊ :
 उत्तर प्रदेश 
लखनऊतील १८व्या शतकात बांधलेल्या या महालाचा राजदरबार ५० मीटर रुंद आहे. विशेष म्हणजे इतक्या रुंद दरबारात एकही खांब नाही. वास्तूविशारदां मध्ये या दरबाराच्या बांधकामाविषयी आश्चर्य व्यक्त केलं जातं. 
 🉑मोटरसायकल बुलेट बाबाचं मंदिर - : 
राजस्थान
एका व्यक्तीच्या रस्त्यात झालेल्या अपघातानंतर त्याची बुलेट पोलिसांनी पोलीस स्थानकात आणली. दुसऱ्या दिवशी ती बुलेट अपघाताच्या ठिकाणी सापडली. पोलिसांनी ती पुन्हा आणून तिला साखळदंडांनी बांधून ठेवलं. तरीही ती अपघाताच्या ठिकाणी गेली. ती कशी गेली याची कोणालाच माहिती नाही. आता मात्र या बुलेटची पूजा केली जाते. प्रत्येक वाटसरू या बुलेट बाबाला वंदन करतो आणि मगच पुढचा प्रवास करतो. 
🉑आशियातील स्वच्छ गाव -: 
 मावलिंनॉग, मेघालय
मेघालयमधील चेरापुंजीजवळ असलेलं हे गाव आशियातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून प्रसिद्ध आहे. तसंच या गावात साक्षरतेचं प्रमाण १०० टक्के इतकं असून इथे प्रत्येकाला अस्खलित इंग्रजी बोलता येतं. Ⓜhttps://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24